इब्री 4:12 म्हणते, "कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. "
पवित्र शास्त्र सुमारे 1900 वर्षांपूर्वी लिहून पूर्ण झाले असले तरी ही त्याची अचूकता आणि प्रासंगिकता आजही अपरिवर्तित आहे. बायबल हे देवाच्या सर्व प्रकटीकरणाचे एकमेव स्त्रोत आहे जे देवाने आपल्याला स्वतःबद्दल आणि मानवतेसाठी त्याच्या योजनेबद्दल सांगण्यासाठी दिलेले आहे.
बायबलमध्ये नैसर्गिक जगाविषयी बरीच माहिती आहे ज्यांची वैज्ञानिक निरीक्षणे आणि संशोधनाद्वारे पुष्टी झाली आहे. यात पुढील काही उताऱ्यांचा समावेश आहे लेवीय १७:११; उपदेशक 1:६-७; ईयोब ३६:२७-२९; स्तोत्र १०२:२५-२७ आणि कलस्सैकर १:१६-१७.
मानवतेसाठी देवाच्या तारणाची योजना जसजशी उलगडत जाते, बायबलतसतसे अनेक भिन्न पात्रांचे स्पष्टपणे वर्णन केले जाते. त्या वर्णनांमध्ये, बायबल मानवी वर्तन आणि प्रवृत्तींबद्दल बरीच माहिती प्रदान करते. आमचा स्वतःचा दैनंदिन अनुभव आम्हाला दाखवतो की ही माहिती कोणत्याही मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकापेक्षा मानवी स्थितीचे अधिक अचूक आणि वर्णनात्मक माहिती देते. बायबलमध्ये नोंदवलेल्या अनेक ऐतिहासिक तथ्यांना अतिरिक्त स्त्रोतांद्वारे पुष्टी दिली गेली आहे. ऐतिहासिक दृष्टया बायबलसंबंधी पुरातत्व पुरावे पुरातत्व खात्याद्वारे मिळाले आहेत जे बायबल अचूक असल्याचे सिद्ध करते आणि याशिवाय अनेक असे ऐतिहासिक दस्तावेज मिळाले आहेता जे बायबलची ऐतिहासिकता अचूक असल्याचे सिद्ध करते.
तथापि, बायबल हे इतिहासाचे पुस्तक, मानसशास्त्राचा मजकूर किंवा वैज्ञानिक पुस्तक नाही. बायबल हे देवाने आपल्याला तो कोण आहे आणि त्याच्या मानवतेसाठीच्या इच्छा आणि योजना काय आहे याविषयी दिलेले वर्णन आहे. या प्रकटीकरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पापाद्वारे देवापासून विभक्त होण्याची कथा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभावरील बलिदानाद्वारे संमेट होण्याची देवाने केलेली तरतूद आपण बायबल मध्ये वाचतो.
बायबलमध्ये अचूक माहिती आहे आणि ते प्रत्येक काळाला लागू होणारे आहे. बायबलचा सर्वात महत्त्वाचा संदेश- मानवाचे तारण—तो मानवतेला सार्वत्रिक आणि कायमस्वरूपी लागू आहे. देवाचे वचन कधीही कालबाह्य होणार नाही, बदलले जाणार नाही किंवा त्यात बदल केले जाणार नाही. संस्कृती बदलतात, कायदे बदलतात, पिढ्या येतात आणि जातात, परंतु देवाचे वचन आजही तितकेच संबंधित आहे जितके ते पहिल्यांदा लिहिले गेले होते. जरी बरेच शास्त्र भाग आज आपल्यासाठी स्पष्टपणे लागू होत नसले तरी सर्व शास्त्रवचनांमध्ये सत्य आहे जे आपण आज आपल्या जीवनात लागू करू शकतो आणि केले पाहिजे.
No comments:
Post a Comment